Type Here to Get Search Results !

विद्यार्थी आंदोलनांतील गुन्हे मागे घेण्याचा राज्य सरकारचा निर्णय; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

 मुंबई : अलीकडील परीक्षा पेपरफुटी प्रकरणांदरम्यान आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे (FIR) मागे घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक भविष्याचा विचार करून घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

सरकारच्या निर्णयानंतर संबंधित प्रकरणांतील गुन्हे मागे घेण्याची प्रशासकीय प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असल्याचे वृत्त आहे. 


Post a Comment

0 Comments